मुंबई | अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक न्यूज चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली होती. अखेर अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळालाय.
अर्णब गोस्वामी यांना तब्बल 8 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत.
अर्णब गोस्वामी यांच्यासोबत इतर दोन आरोपींनाही जामीन मंजूर करून देण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिलेत.
अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केलेली.
…त्यावेळी मी माझी विकेट द्यायला हवी होती- रोहित शर्मा
“बिहारमध्ये शिवसेनेची जी अवस्था केली तशी महाराष्ट्रातंही संजय राऊत करतील”
निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो- शिवसेना
अलिबाग कारागृहात अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी 2 पोलीस निलंबित
आयपीएलचं जेतेपद जिंकल्यानंतर मुंबईचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; म्हणाले…