नवी दिल्ली | अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान स्वावलंबी स्वस्थ भारत मिशन योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तब्बल 64184 कोटींची असणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय.
या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य युनिटची स्थापना केली जाईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय.
दरम्यान, अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!
नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल
‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली