महाराष्ट्रातील ‘या’ शहरात भयाण वास्तव, कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराला माणसं मिळेना!
औरंगाबाद | महाराष्ट्रात सध्या देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून येत आहे. काही ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून प्रशासनातर्फे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढली असताना मृत्यू दरही वाढला असल्याचं दिसून येत आहे.
वाढलेल्या कोरोना मृत्यूमुळे औरंगाबादमध्ये मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याचं चित्र दिसून येतंय. परिणामी कोरोना रुग्णांचे मृतदेह हे वार्डातच पडून राहत आहेत. औरंगाबादच्या घाटी प्रशासनाच्या अडचणीत यामुळे वाढ झाली आहे.
औरंगाबादमध्ये साधारण दर दिवशी 25 ते 30 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. या मृतदेहांची पॅकिंग करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 7 ते 8 तासांचा वेळ खर्ची पडत आहे. कारण की, पॅकिंग करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने घाटी प्रशासन हे काम करण्यासाठी लोकांचा शोध घेत आहे.
मागच्या महिन्याभरात औरंगाबाद मध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सगळ्यांमध्येच आता मृत्यू दरही वाढत असल्याने आणि मृत झालेल्या रुग्णाची पॅकिंग करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने घाटी प्रशासन अडचणीत सापडलं आहे. औरंगाबादच्या घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांनी कंत्राटी तत्वावर मृतदेह पॅक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील केल्याचं सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
एप्रिल-मे मध्ये होईल कोरोना कहर; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे धक्कादायक निष्कर्ष!
एक हात गळ्यात दुसरा छातीवर; पतीला कल्पनाही नव्हती की पत्नीच्या डोक्यात काय शिजतंय!
बाॅलिवुड स्टार अक्षय कुमारला कोरोनाची लागण
‘ही’ गोष्ट करा तुम्हाला संचारबंदीचा त्रास होणार नाही, पोलिसांनीच दिला शब्द
विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.