‘तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही’; फडणवीस कडाडले
औरंगाबाद | औरंगाबादेत भाजपच्या (BJP) जल आक्रोश मोर्चानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेल आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पाणी मिळत नाही तोपर्यत संघर्ष सूरूच ठेवणार, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात औरंगाबादेत आज जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या सख्येंने लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) सडकून टीका केली आहे.
आता मागे जायचं नाही. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही तोपर्यंत भाजप झोपणार नाही आणि झोपूही देणार नाही, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
दरम्यान, एकएका नेत्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा संघर्ष असाच पुढे चालू राहिल. हा संघर्ष तुमच्या भरवशावर सुरू राहिल, असंही फडणवीस म्हणाले. तर आताही या सरकारची कुंभकर्णी झोप नाही उडाली तर या सरकारला कोणीही वाचवू शकत नाही, असा घणाघातही फडणवीसांनी केला.
थोडक्यात बातम्या-
‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका
‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…
“अजित पवार आज सत्तेत आहेत उद्या नसतील, पण फडणवीस सत्तेत आल्यावर…”
देशात मंकीपॉक्सची दहशत, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला”
Comments are closed.